

पुस्तक - पासबुक माझ्या आयुष्याचं (Passboook Mazya Ayushyache)
लेखिका - आरती संजय कार्लेकर (Arati Karlekar)
भाषा - मराठी
पाने - १७६
प्रकाशन - संवेदना प्रकाशन जून २०२४
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-81-19737-23-9
आरती कार्लेकर ह्याचं हे आत्मचरित्र आहे. हे वाक्य वाचल्यावर कदाचित तुमच्या मनात येईल की ह्याचं नाव ऐकल्यासारखं वाटत नाही. यांचं काम काय ?
आरती कार्लेकर ह्याचं हे आत्मचरित्र आहे. हे वाक्य वाचल्यावर कदाचित तुमच्या मनात येईल की ह्याचं नाव ऐकल्यासारखं वाटत नाही. यांचं काम काय ?
ते सांगतोच, पण त्याआधी मला सांगा; की बसमध्ये गर्दीच्या वेळी एखादा मुलगा विनाकारण लोकांची वाट अडवून मुलींना अडचण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय कराल ? ऑफिसमध्ये बदली व्हावी यासाठी केलेल्या अर्जावर कारवाई करण्यासाठी तुमचा युनियन लीडर तुमच्याकडे अनैतिक मागणी करत असेल तर तुम्ही काय कराल? तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी संस्था विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत असेल पण त्यातल्या सज्जन शिक्षकाला तिथले संस्थाचालक त्रास देत असतील, खोटेनाटे आरोप करून बदनाम करत असतील तर तुम्ही काय कराल?
आपल्या अंगात किती धडाडी आहे, स्वतःची नैतिकता किती आहे, गावगुंडांना व राजकारण्यांना शिंगावर घ्यायची धमक किती आहे यावर आपला प्रतिसाद अवलंबून राहील. ह्या सगळ्या प्रसंगांत या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांच्याच काय पण बहुतांश पुरुषांच्याही कितीतरी पट जास्त धडाडीच्या, खमक्या आणि शूर आहेत आरतीताई.
बस मध्ये वाट अडवणाऱ्या गावगुंडाला सर्वांसमक्ष खणखणीत मुस्काडात हाणण्याची आणि "परत असं करायचं नाही आणि माझ्या वाटेला जायचा तर विचार पण करायचा नाही" हे सांगण्याची धमक त्यांच्यात आहे.
ऑफिसमधल्या युनियन लीडरच्या धमकीला न घाबरता त्याची अंडीपिल्ली बाहेर काढून बडतर्फ करायची चिकाटी आहे.
आपल्या अंगात किती धडाडी आहे, स्वतःची नैतिकता किती आहे, गावगुंडांना व राजकारण्यांना शिंगावर घ्यायची धमक किती आहे यावर आपला प्रतिसाद अवलंबून राहील. ह्या सगळ्या प्रसंगांत या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांच्याच काय पण बहुतांश पुरुषांच्याही कितीतरी पट जास्त धडाडीच्या, खमक्या आणि शूर आहेत आरतीताई.
बस मध्ये वाट अडवणाऱ्या गावगुंडाला सर्वांसमक्ष खणखणीत मुस्काडात हाणण्याची आणि "परत असं करायचं नाही आणि माझ्या वाटेला जायचा तर विचार पण करायचा नाही" हे सांगण्याची धमक त्यांच्यात आहे.
ऑफिसमधल्या युनियन लीडरच्या धमकीला न घाबरता त्याची अंडीपिल्ली बाहेर काढून बडतर्फ करायची चिकाटी आहे.
अटीतटीच्या प्रसंगी प्रत्यक्ष शस्त्र उभारून स्वसंरक्षण करण्याची निडरता त्यांच्यात आहे. प्रामाणिक शिक्षकाला त्रास देणाऱ्या संस्थाचालकांच्या विरुद्ध आवाज उठवून पोलीस स्टेशन गाजवणाऱ्या दुर्गेचं स्वरूप त्या घेऊ शकतात.
आता तुमच्या मनात येईल म्हणजे बहुतेक या कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या "लीडर बाई" दिसतायत. आपल्या नेत्याच्या आदेशावरून रस्त्यावर राडेबाजी करणाऱ्या असाव्यात. पण तसं अजिबात नाहीये. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या, लग्नानंतरही तशाच नोकरदारांच्या कुटुंबात वावरणाऱ्या त्या एक निवृत्त बँक अधिकारी आहेत. पुणे, चाकण, सावंतवाडी, वेंगुर्ला इथे त्यांनी काम केलं आहे. पण मी- माझं घर - माझी मुलं माझं कुटुंब - इतकाच स्वतःचा परीघ न ठेवता आपल्या आजूबाजूचा समाज हा सुद्धा आपलाच आहे याचं भान ठेवून त्या वावरतात हे त्यांचं सामान्यातलं असामान्यत्व.
आता तुमच्या मनात येईल म्हणजे बहुतेक या कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या "लीडर बाई" दिसतायत. आपल्या नेत्याच्या आदेशावरून रस्त्यावर राडेबाजी करणाऱ्या असाव्यात. पण तसं अजिबात नाहीये. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या, लग्नानंतरही तशाच नोकरदारांच्या कुटुंबात वावरणाऱ्या त्या एक निवृत्त बँक अधिकारी आहेत. पुणे, चाकण, सावंतवाडी, वेंगुर्ला इथे त्यांनी काम केलं आहे. पण मी- माझं घर - माझी मुलं माझं कुटुंब - इतकाच स्वतःचा परीघ न ठेवता आपल्या आजूबाजूचा समाज हा सुद्धा आपलाच आहे याचं भान ठेवून त्या वावरतात हे त्यांचं सामान्यातलं असामान्यत्व.
इनर्व्हील संस्था, विधी प्राधिकरण यांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामाला त्यांनी हातभार लावला आहे. विशेष सांगायचं म्हणजे सावंतवाडीला त्यांच्या स्वतःच्या घरी अनेक गरजू स्त्रिया, परित्यक्ता, घटस्फोटीता येऊन राहत. त्यांना मानसिक आधार, योग्य मार्गदर्शन आणि पदरमोड करून आर्थिक आधार देत त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचं काम त्यांनी केले आहे.
दोन प्रसिद्ध गीतांतल्या ओळी मला आठवल्या ...
अन्याय घडो कोठेही की दुनियेच्या बाजारी | धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्यमंत्र हा गाऊ
आणि
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
पहिल्या ओळीतली खंबीरता आणि दुसरीतली सहृदयता एकाच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावली आहे
हे सगळे अनुभव आरतीताईंनी आपल्या या चरित्रात्मक पुस्तकातून मांडले आहेत. "डेंजर" कामासाठी त्यांचा पिंड अनुकूल आहेच पण आईवडीलही धीट आणि मुलीची पाठराखण करणारे होते. जडणघडण, संस्कार, बेताच्या परिस्थितीशी झगडत केलेल्या शिक्षण ही पार्श्वभूमी पुस्तकात आहे. वर उल्लेख केलेलं युनियन अधिकाऱ्याच्या धमकीचं प्रकरण सविस्तरपणे पुस्तकात आहे. त्या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर त्या पुण्यातून सावंतवाडीला गेल्या. नवऱ्यासाठी व्यवसाय म्हणून घरगुती गॅस एजन्सी सुरू केली. स्वतः अंगमेहनत करून ती नावारूपाला आणली.
अन्याय घडो कोठेही की दुनियेच्या बाजारी | धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्यमंत्र हा गाऊ
आणि
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
पहिल्या ओळीतली खंबीरता आणि दुसरीतली सहृदयता एकाच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावली आहे
हे सगळे अनुभव आरतीताईंनी आपल्या या चरित्रात्मक पुस्तकातून मांडले आहेत. "डेंजर" कामासाठी त्यांचा पिंड अनुकूल आहेच पण आईवडीलही धीट आणि मुलीची पाठराखण करणारे होते. जडणघडण, संस्कार, बेताच्या परिस्थितीशी झगडत केलेल्या शिक्षण ही पार्श्वभूमी पुस्तकात आहे. वर उल्लेख केलेलं युनियन अधिकाऱ्याच्या धमकीचं प्रकरण सविस्तरपणे पुस्तकात आहे. त्या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर त्या पुण्यातून सावंतवाडीला गेल्या. नवऱ्यासाठी व्यवसाय म्हणून घरगुती गॅस एजन्सी सुरू केली. स्वतः अंगमेहनत करून ती नावारूपाला आणली.
बँक सांभाळून सामाजिक कामात भाग घेतला. वेळोवेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ते सगळे प्रसंग पुस्तकात आहेत. वाचनीय किस्से आहेत.
त्यांचं लग्नापूर्वीचे नाव "विद्या". पुस्तकात सुरुवातीला तेव्हाची "विद्या" आणि आत्ताची "आरती" जुन्या आठवणी सांगताहेत अशा पद्धतीने वर्णन आहे. त्यानंतर त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून "आरती"च्या आयुष्याचं वर्णन आहे. हे शब्दांकन लेखिका वैशाली पंडित यांनी केलं आहे. कमीत कमी शब्दात प्रसंग डोळ्यासमोर उभं करणारं वर्णन आहे. त्यांच्या आयुष्यातले प्रसंगच इतके थरारक आहेत की आपण पुस्तक हातात घेतल्यावर सलग वाचत राहतो. आता आरती ताई कुठला पराक्रम करतात याची उत्सुकता वाटत राहते.
हा त्रयस्थ निवेदक नायिकेच्या भूमिकेचं कौतुक करतो. तिला वेगवेगळी विशेषणही लावतो. तसं म्हटलं तर हा "आत्मस्तुतीचा दोष" वाटू शकतो पण आरती ताईंचं कामच असं आहे की ही विशेषणे आत्मस्तुती न वाटता "स्व ची साधार जाणीव" आहे हे आपल्या लक्षात येतं.
आता काही पाने उदाहरणादाखल.
ऑफिसमधला युनियन लीडर घरी येऊन धमकी देऊ लागला तेव्हा एक भयानक प्रसंग होता होता टळला तो लेखिकेच्या प्रसंगावधानामुळे.


सावंतवाडीला बदली घेतल्यावर नवऱ्यासाठी त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरची एजन्सी घेतली. स्वतः शारीरिक कष्टाला पुढे मागे बघितले नाही. गावकरी अचंबित झाले नसते तरच नवल.


गावातल्या एका भंगारवालीला पोलिसांनी चोरीचा खोटा आळ घेऊन अटक केली. अशावेळी त्या बाईच्या मुलीने मदतीसाठी धाव घेतली ती आरती ताईंकडेच. तो प्रसंग


माझी आरतीताईंशी ओळख झाली ती आमच्या "पुस्तकप्रेमी" नावाच्या एका साहित्यविषयक उपक्रमातून व्हाट्सअप ग्रुप मधून. पण एक निवृत्त बँक अधिकारी व वाचनप्रेमी इतकीच जुजबी ओळख मलाही होती. जून महिन्यात आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचं दोन दिवसीय संमेलन कराडला झालं. त्या संमेलनात आरतीताईंच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व तेव्हा प्रत्यक्ष जाणवलं. त्या स्वतः कार चालवत काही सदस्यांना घेऊन घेऊन पुण्याहून कराडला आल्या हे कळलं. प्रकाशनाच्या वेळी सूत्रसंचालक म्हणाले की "त्यांनी त्यांच्या हाताने अनेक जणांची तोंड रंगवली आहेत". या सगळ्यामुळे उत्सुकता वाटून हे पुस्तक मी लगेच विकत घेतलं. वाचायला सुरुवात केल्यावर त्यात इतका गुंगून घेतो की दोन दिवसातच वेळ मिळेल तसा हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.आरती ताईंच्या आयुष्यातल्या विशेष प्रसंगांची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या समाजसेवेची मला ओळख झाली. इतरांनाही ती व्हावी असं मनापासून वाटतं आहे.


एखाद दोन वर्षांपूर्वी वाचलेली "पोलादी" हे अनुजा तेंडोलकर ह्यांचं आत्मकथन आठवलं. त्याही वेंगुर्ल्याच्या . व्यावसायिक, महिला वेटलिफ्टर आणि स्थानिक अन्यायाला पुरून उरलेल्या. त्या पुस्तकाचे मी लिहिलेले परीक्षण वाचण्यासाठी लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/poladi/
एक मध्यमवर्गीय नोकरदार गृहिणी आपली बुद्धिमत्ता,धडाडी आणि निडरता या गुणांच्या जोरावर किती प्रभावशाली ठरू शकते हे आरती ताईकडे बघितल्यावर कळतं. एक जागरूक नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावून आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल कसा घडवता येईल याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोणी लुंगासुंगा चित्रपट अभिनेता, वेडेवाकडे नाचणारे "रील"वाले हे आपल्या समाजात सेलिब्रिटी ठरतात. लाखो लोकांना ते माहीत असतात. पण आरती ताईंसारखे खरे हिरो आहेत म्हणून समाजाचा तोल राहतो आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ना!
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
त्यांचं लग्नापूर्वीचे नाव "विद्या". पुस्तकात सुरुवातीला तेव्हाची "विद्या" आणि आत्ताची "आरती" जुन्या आठवणी सांगताहेत अशा पद्धतीने वर्णन आहे. त्यानंतर त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून "आरती"च्या आयुष्याचं वर्णन आहे. हे शब्दांकन लेखिका वैशाली पंडित यांनी केलं आहे. कमीत कमी शब्दात प्रसंग डोळ्यासमोर उभं करणारं वर्णन आहे. त्यांच्या आयुष्यातले प्रसंगच इतके थरारक आहेत की आपण पुस्तक हातात घेतल्यावर सलग वाचत राहतो. आता आरती ताई कुठला पराक्रम करतात याची उत्सुकता वाटत राहते.
हा त्रयस्थ निवेदक नायिकेच्या भूमिकेचं कौतुक करतो. तिला वेगवेगळी विशेषणही लावतो. तसं म्हटलं तर हा "आत्मस्तुतीचा दोष" वाटू शकतो पण आरती ताईंचं कामच असं आहे की ही विशेषणे आत्मस्तुती न वाटता "स्व ची साधार जाणीव" आहे हे आपल्या लक्षात येतं.
आता काही पाने उदाहरणादाखल.
ऑफिसमधला युनियन लीडर घरी येऊन धमकी देऊ लागला तेव्हा एक भयानक प्रसंग होता होता टळला तो लेखिकेच्या प्रसंगावधानामुळे.


सावंतवाडीला बदली घेतल्यावर नवऱ्यासाठी त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरची एजन्सी घेतली. स्वतः शारीरिक कष्टाला पुढे मागे बघितले नाही. गावकरी अचंबित झाले नसते तरच नवल.


गावातल्या एका भंगारवालीला पोलिसांनी चोरीचा खोटा आळ घेऊन अटक केली. अशावेळी त्या बाईच्या मुलीने मदतीसाठी धाव घेतली ती आरती ताईंकडेच. तो प्रसंग


माझी आरतीताईंशी ओळख झाली ती आमच्या "पुस्तकप्रेमी" नावाच्या एका साहित्यविषयक उपक्रमातून व्हाट्सअप ग्रुप मधून. पण एक निवृत्त बँक अधिकारी व वाचनप्रेमी इतकीच जुजबी ओळख मलाही होती. जून महिन्यात आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचं दोन दिवसीय संमेलन कराडला झालं. त्या संमेलनात आरतीताईंच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व तेव्हा प्रत्यक्ष जाणवलं. त्या स्वतः कार चालवत काही सदस्यांना घेऊन घेऊन पुण्याहून कराडला आल्या हे कळलं. प्रकाशनाच्या वेळी सूत्रसंचालक म्हणाले की "त्यांनी त्यांच्या हाताने अनेक जणांची तोंड रंगवली आहेत". या सगळ्यामुळे उत्सुकता वाटून हे पुस्तक मी लगेच विकत घेतलं. वाचायला सुरुवात केल्यावर त्यात इतका गुंगून घेतो की दोन दिवसातच वेळ मिळेल तसा हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.आरती ताईंच्या आयुष्यातल्या विशेष प्रसंगांची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या समाजसेवेची मला ओळख झाली. इतरांनाही ती व्हावी असं मनापासून वाटतं आहे.


एखाद दोन वर्षांपूर्वी वाचलेली "पोलादी" हे अनुजा तेंडोलकर ह्यांचं आत्मकथन आठवलं. त्याही वेंगुर्ल्याच्या . व्यावसायिक, महिला वेटलिफ्टर आणि स्थानिक अन्यायाला पुरून उरलेल्या. त्या पुस्तकाचे मी लिहिलेले परीक्षण वाचण्यासाठी लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/poladi/
एक मध्यमवर्गीय नोकरदार गृहिणी आपली बुद्धिमत्ता,धडाडी आणि निडरता या गुणांच्या जोरावर किती प्रभावशाली ठरू शकते हे आरती ताईकडे बघितल्यावर कळतं. एक जागरूक नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावून आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल कसा घडवता येईल याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोणी लुंगासुंगा चित्रपट अभिनेता, वेडेवाकडे नाचणारे "रील"वाले हे आपल्या समाजात सेलिब्रिटी ठरतात. लाखो लोकांना ते माहीत असतात. पण आरती ताईंसारखे खरे हिरो आहेत म्हणून समाजाचा तोल राहतो आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ना!
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-