ही ’श्री’ची इच्छा Hi 'Shri' Chi Ichcha






पुस्तक : ही 'श्री'ची इच्छा 
लेखक : डॉ. श्रीनिवास (श्री) ठाणेदार 
भाषा : मराठी 
पाने : २०५
ISBN : दिलेला नाही 

गरिबी आणि प्रतिकूलतेशी झगडून काही जण आपली परिस्थिती सुधारतात. काहीजण फक्त या सुधारणेवर थांबत नाहीत तर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करतात. अशांपैकी एक म्हणजे अमेरिकेतले भारतीय उद्योजक श्रीनिवास ठाणेदार. बेळगावात निम्न मध्यवर्गीय परिस्थिती वाढलेल्या श्रीनिवास यांनी स्वतःच्या मेहनतीवर आपलं उच्चशिक्षण घेतलं. पुढच्या प्रगत शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. ते शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला नोकरी आणि नंतर केमिकल लॅब शी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज ते यशस्वी उद्योजकांपैकी आहेत. आणि दुसरीकडे अमेरिकेतल्या मराठी सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहेत. या पुस्तकात त्यांनी या संघर्षाची , आशा-निराशेच्या खेळाची, खाजगी आयुष्यात आलेल्या हादरवून टाकणाऱ्या संकटांची आणि पुन्हा पुन्हा उभारी घेणाऱ्या त्यांच्या जिद्दीची कहाणी सांगितली आहे. 





उदा. ग्रॅज्युएशन झाल्यावर नोकरी आणि पुढचं शिक्षण आणि कॉलेज संपवून पहिला इंटरव्यू द्यायला गेले तेव्हाची स्थिती वाचा 
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा )



बेताची परिस्थितीशी दोन हात एकीकडे चालू नशीब सुद्धा फिरकी घेत होतं. अमेरिकेचा व्हिसा पुन्हापुन्हा नाकारला जाण्याचे प्रसंग आधी घडले होते. आता अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्रीन कार्ड हुलकावण्या देत होतं. त्याचा हा किस्सा 




शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरीकेत नोकरी केली त्यातसुद्धा आपल्या हुशारीची चमक दाखवली. त्यातूनच पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु करायच्या स्वप्नाने जन्म घेतला. त्यांच्या पहिल्या व्यवसायाची सुरुवात अशी झाली 





पुढे त्यांनी व्यवसाय कसा वाढवला. पत्नीच्या आकस्मिक निधनातून स्वतःला आणि घराला कसं सावरलं हे लिहिलं आहे. झालेल्या चुका, चुकलेले आडाखे सुद्धा प्रांजळपणे काबुल केले आहेत. व्यवस्थापनात स्वतःचा असा खास मार्ग त्यांनी निवडला याबद्दल ते लिहितात 



लेखकाची शैली अतिशय ओघवती आहे. (शब्दांकन शोभा बोन्द्रे यांचं आहे ) पुस्तकात महत्वाचे प्रसंगच सांगितले आहेत. कटुप्रसंग नक्कीच सांगितले आहेत पण त्याचा वापर वाचकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला नाही. अजिबात पाल्हाळ न लावताही त्यांचं गांभीर्य अधोरेखित होतं. 

हे पुस्तक प्रेरणादायी आणि आश्वासक आहे. स्वतःवर विश्वास ठेवून, जिद्दीने आणि मेहनतीने काम करत राहिलं तर आयुष्याचा कायापालट घडवण्याची खूप मोठी क्षमता प्रत्येकात आहे हा विश्वासाचा अंकुर जागवणारं आहे. 

पुस्तकात २००५ पर्यंतचे प्रसंग आहेत. त्यानंतरची गेली १५ वर्षांची वाटचाल सुद्धा वाचनीयच असेल. त्यांनी अमेरिकेत निवडणूक सुद्धा लढवलेली आणि आत्ताही एका निवडणुकीसाठी ते उभे आहेत. काही वर्षांनी हा पुढचा भाग देखील आपल्याला वाचायला मिळेल. 



---------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
---------------------------------------------------------------------------------





---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

काचेपलीकडचे जग (kAchepalikadache jag)




पुस्तक : काचेपलीकडचे जग (kAchepalikadache jag)
लेखक :विद्याधर म्हैसकर (Vidyadhar Mhaiskar)
भाषा :मराठी (Marathi)
पाने : २३८
ISBN : दिलेला नाही

"आत्मनिर्भर" हा सध्या चर्चेत असलेला शब्द आहे. आत्मनिर्भर असणं, स्वावलंबी असणं हे कुठल्याही देशासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे स्वदेशीची चळवळ आपल्या देशात बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही स्वराज्य, स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी चतु:सूत्री आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी सांगितली होती. लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तत्कालीन तरुणांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली होती.  क्रांतिकार्य, समाजकार्य  आणि शिक्षणकार्यात भाग घेतला होता. तर काहींनी स्वदेशी उद्योग सुरू करून या पुनरूत्थानाला गती दिली होती. ओगले ग्लास वर्क हा असाच ध्येयवादाने प्रेरित झालेल्या तरुणांचा अभिनव आणि यशस्वी उपक्रम होता.

ओगले कुटुंबातल्या तरुणांनी या उद्योगाची स्थापना केली. औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांना जागा आणि भांडवल उपलब्ध करून दिलं. आणि काही महिन्यांतच परदेशी काचेच्या तोडीस तोड काच महाराष्ट्रात बनू लागली. पूर्वी घरोघरी दिसणारे "प्रभाकर" ब्रँडचे कंदील हे त्यांचं लोकप्रिय उत्पादन. या उद्योगाच्या संस्थापकांच्या तिसऱ्या पिढीतले विद्याधर म्हैसकर यांनी या उद्योगाच्या सुरुवातीची आणि पहिल्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीची वाटचालीची वाटचालीची कहाणी सांगितली आहे या पुस्तकात सांगितली आहे आहे. ओगले कुटुंबातल्या व्यक्ती गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यांच्या आठवणीतून कथनातून हा सगळा प्रवास उलगडतो.

जागेचा प्रश्न राजाश्रयामुळे सुटला आणि पुढची लढाई सुरू झाली. उजाड माळरानावर असलेला निवडुंग साफ करून ती जागा वसतीयोग्य करण्यापासून सुरुवात होती. गावापासून दूर असल्यामुळे आजूबाजूला जे लोक उपलब्ध होते त्यांनाच घेऊन, मार्गदर्शन करत, शिकवत, त्यांच्या चुका सांभाळत कारखान्याची उभारणी सुरू झाली झाली. त्या दिवसांबद्दलच्या आठवणी जरा बघा.



ओगले बंधूंपैकी एक जण काच निर्मिती तंत्रज्ञान तंत्रशाळेतून शिकून आले शाळेतून शिकून शाळेतून शिकून आले होते पण त्याच ज्ञानावर  थांबणं हे काही त्यांच्या स्वभावात नव्हतं या तंत्रज्ञानात नवं काय काय घडत आहे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या कारखान्यात ते आलं आलं आपल्या कारखान्यात ते आलं आलं पाहिजे हा त्यांचा ध्यास कायम राहिला कायम राहिला तू नच त्यातूनच परदेशी मालाला टक्कर देऊ शकेल अशी काच तयार झाली.  काचेची निरनिराळी उत्पादने आणि जोडउत्पादनांची भरभराट झाली. त्याबद्दलचा हा एक प्रसंग पहा.





"ह्यूमन रिसोर्सेस" हा हल्लीच शब्द कदाचित त्यावेळी रुळलेलाही नसेल पण ओगल्यांसाठी त्यांचे कामगार, अधिकारी हे ह्यूमन रिसोर्सेस होते. आपल्याकडे काम करणाऱ्या, कामगार वस्तीतल्या रहिवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे एका माळरानाचे एका औद्योगिक वसाहतीत रूपांतर झालं.

पुस्तकातल्या कथनाच्या प्रवाहात फक्त ह्या उद्योगाचीच नाही तर ओगले कुटुंबीयांमधल्या परस्पर स्नेहाची आणि त्या वेळच्या परिस्थितीची सुद्धा नकळत ओळख होते. एका प्रसंगात सोन्याचा हार पोस्टाने मागवला हार पोस्टाने मागवला होता याचा उल्लेख आहे! इतका इंग्रजी व्यवस्थेवर विश्वास होता. गावोगावी डॉक्टर तेव्हा उपलब्ध नव्हते. साध्या सध्या उपचारांसाठीही दुसऱ्या गावी जाऊन औषध आणायचं किंवा दुसऱ्या गावावरून डॉक्टर येणार अशी परिस्थिती. ओगले कुटुंबातील ज्येष्ठ- प्रभाकर ओगले (ज्यांनी आयुर्वेदावर "चिकित्सा प्रभाकर" हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे) त्यांचा हा किस्सा वाचा.



ओगल्यांनी आपल्या उत्पादनांत विविधता आणली तसाच व्य्वसायाचा भौगोलिक विस्तारसुद्धा केला. नागपूर, म्हैसूर, केरळ आणि श्रीलंकेत सुद्धा त्यांचा कारखाना सुरू झाला. महाराष्ट्राला, मराठी माणसाला अभिमानास्पद आणि मार्गदर्शक अशी ही कहाणी आहे आणि ती सांगितली सुद्धा आहे समर्पक रोचक-रंजक शैलीत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे या उद्योगाचा पुढचा प्रवास कसा झाला हे वाचायची उत्सुकता आपल्याला लागते. लेखकाकडून हा पुढचा भाग लिहून झाला तर मजा येईल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------




अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...