

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)
लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - रु. १६० /-
लेखक सुरेश देशपांडे यांनी हे पुस्तक मला भेट दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.

पुस्तकाच्या नावाप्रमाणेच ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट आहे. कथेचा नायक हाच निवेदक आहे. बँकेत नोकरी लागण्याच्या वयापासून निवृत्त होईपर्यंतच्या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना तो सांगतो आहे. तरुणपणी एका मुलीशी निखळ मैत्री, त्याचं पहिलं प्रेम, त्याच्या जिवलग मित्राशी मनमोकळा संवाद, एका सामाजिक संस्थेबरोबर काम, मैत्रिणीच्या कौटुंबिक समस्या, मित्राच्या कौटुंबिक समस्या असे बरेच प्रसंग त्यात येतात.
पुस्तक विनोदी नाही किंवा रडकंही नाही. थोडं सामाजिक आहे. पण लेखकाला काही ठळक सामाजिक समस्या, मुद्दे महत्वाचे वाटतात इतकंच त्यातून कळतं. निवेदनाच्या ओघात पुस्तक अचानक माहितीपर होतं. निवेदक किंवा एखादं पात्र आपल्याला चक्क एखाद्या लेखाप्रमाणे माहिती सांगतं. उदा. नायकाची पत्नी एका मूकबधिर शाळेत शिकवायला जायचा निर्णय घेते तेव्हा मूकबधिर म्हणजे काय, मतिमंद म्हणजे काय, अशी मुलं का जन्माला येतात, त्यांना काय वेगळा गरज असतात हे नायकाची पत्नी नायकाला समजावून सांगते. दुसऱ्या एका प्रसंग आहे ज्यात एका भूखंडावर अतिक्रमण होतं. त्यातही एक पात्र समजावून सांगतं की राजकारणी आणि गुंड ह्यांचे हे साटेलोटे आहे. तर एकदा नायक मी हे पुस्तक वाचलं असं म्हणत "युद्ध विरहित जग" पुस्तकाचा परिचय देतो.
टिव्ही वरच्या मालिकांमध्ये कसं सतत काही ना काही घडत असतं. प्रसंगांचा एक "ट्रॅक" संपतो, मग दुसरा सुरू होतो. तसंच पुस्तक वाचताना वाटलं की ही न संपणारी मालिका तर नाहीना. पण मालिकांमध्ये एखादा लहान प्रसंग सुद्धा बरेच भाग चालतो. कारण प्रत्येक पात्राच्या भावभावना, चेहऱ्यावरचे हावभाव, संवाद असं दाखवत दाखवत प्रसंग फुलवतात. नको इतका ताणतात किंवा भडक करतात. ह्याउलट हे पुस्तक आहे. किती तरी गंभीर, कौटुंबिक आणि वैचारिक वादळे निर्माण करणारे प्रसंग करणारे यात घडतात उदा. नवराबायको मूल न होऊ देता दत्तक घेण्याचा विचार करतात, एक घटस्फोटीता एका मतिमंद मुलीला दत्तक घेते, दोन पात्रांचा आंतरधर्मीय विवाह होतो इ . पण सगळं अगदी चुटकीसरशी घडतं. ही पात्रं दुसऱ्या पात्रांना आपला विचार सांगतात. मग इतर पात्रं थोडासा विचार करतात आणि लगेच सगळे होकार देतात सगळं छान छान होतं. त्यामुळे प्रसंग खुलत नाहीत मनावर ठसत नाहीत.
पुस्तकातली दोन प्रसंगांची पाने उदाहरणादाखल देतो
नायक ज्या सामाजिक संस्थेची निगडित असतो त्या संस्थेच्या जागेवर गावगुंड अतिक्रमण करत असतात आणि त्याला विरोध करणाऱ्या संस्था चालकांना अपघात होतो तो प्रसंग


नायक आणि त्याची पत्नी मूल जन्माला न घालता दत्तक घेण्याचा विचार घरच्यांना सांगतात तेव्हा


साधारण पुस्तकाचे स्वरूप लक्षात आलं असेल. वाचताना कंटाळा येत नाही पण पुढे वाचत राहायची उत्सुकताही वाटत नाही. इतके नाट्यमय प्रसंग असूनही ते अजून खुलवले असते अजून चांगल्या पद्धतीने गुंफले असते तर कादंबरीची रंजकता वाढली असती असं मला वाटलं.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - रु. १६० /-
प्रकाशन - पार्थ प्रकाशन नोव्हेंबर २०२४
ISBN - दिलेला नाही लेखक सुरेश देशपांडे यांनी हे पुस्तक मला भेट दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.

पुस्तकाच्या नावाप्रमाणेच ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट आहे. कथेचा नायक हाच निवेदक आहे. बँकेत नोकरी लागण्याच्या वयापासून निवृत्त होईपर्यंतच्या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना तो सांगतो आहे. तरुणपणी एका मुलीशी निखळ मैत्री, त्याचं पहिलं प्रेम, त्याच्या जिवलग मित्राशी मनमोकळा संवाद, एका सामाजिक संस्थेबरोबर काम, मैत्रिणीच्या कौटुंबिक समस्या, मित्राच्या कौटुंबिक समस्या असे बरेच प्रसंग त्यात येतात.
पुस्तक विनोदी नाही किंवा रडकंही नाही. थोडं सामाजिक आहे. पण लेखकाला काही ठळक सामाजिक समस्या, मुद्दे महत्वाचे वाटतात इतकंच त्यातून कळतं. निवेदनाच्या ओघात पुस्तक अचानक माहितीपर होतं. निवेदक किंवा एखादं पात्र आपल्याला चक्क एखाद्या लेखाप्रमाणे माहिती सांगतं. उदा. नायकाची पत्नी एका मूकबधिर शाळेत शिकवायला जायचा निर्णय घेते तेव्हा मूकबधिर म्हणजे काय, मतिमंद म्हणजे काय, अशी मुलं का जन्माला येतात, त्यांना काय वेगळा गरज असतात हे नायकाची पत्नी नायकाला समजावून सांगते. दुसऱ्या एका प्रसंग आहे ज्यात एका भूखंडावर अतिक्रमण होतं. त्यातही एक पात्र समजावून सांगतं की राजकारणी आणि गुंड ह्यांचे हे साटेलोटे आहे. तर एकदा नायक मी हे पुस्तक वाचलं असं म्हणत "युद्ध विरहित जग" पुस्तकाचा परिचय देतो.
टिव्ही वरच्या मालिकांमध्ये कसं सतत काही ना काही घडत असतं. प्रसंगांचा एक "ट्रॅक" संपतो, मग दुसरा सुरू होतो. तसंच पुस्तक वाचताना वाटलं की ही न संपणारी मालिका तर नाहीना. पण मालिकांमध्ये एखादा लहान प्रसंग सुद्धा बरेच भाग चालतो. कारण प्रत्येक पात्राच्या भावभावना, चेहऱ्यावरचे हावभाव, संवाद असं दाखवत दाखवत प्रसंग फुलवतात. नको इतका ताणतात किंवा भडक करतात. ह्याउलट हे पुस्तक आहे. किती तरी गंभीर, कौटुंबिक आणि वैचारिक वादळे निर्माण करणारे प्रसंग करणारे यात घडतात उदा. नवराबायको मूल न होऊ देता दत्तक घेण्याचा विचार करतात, एक घटस्फोटीता एका मतिमंद मुलीला दत्तक घेते, दोन पात्रांचा आंतरधर्मीय विवाह होतो इ . पण सगळं अगदी चुटकीसरशी घडतं. ही पात्रं दुसऱ्या पात्रांना आपला विचार सांगतात. मग इतर पात्रं थोडासा विचार करतात आणि लगेच सगळे होकार देतात सगळं छान छान होतं. त्यामुळे प्रसंग खुलत नाहीत मनावर ठसत नाहीत.
पुस्तकातली दोन प्रसंगांची पाने उदाहरणादाखल देतो
नायक ज्या सामाजिक संस्थेची निगडित असतो त्या संस्थेच्या जागेवर गावगुंड अतिक्रमण करत असतात आणि त्याला विरोध करणाऱ्या संस्था चालकांना अपघात होतो तो प्रसंग


नायक आणि त्याची पत्नी मूल जन्माला न घालता दत्तक घेण्याचा विचार घरच्यांना सांगतात तेव्हा


साधारण पुस्तकाचे स्वरूप लक्षात आलं असेल. वाचताना कंटाळा येत नाही पण पुढे वाचत राहायची उत्सुकताही वाटत नाही. इतके नाट्यमय प्रसंग असूनही ते अजून खुलवले असते अजून चांगल्या पद्धतीने गुंफले असते तर कादंबरीची रंजकता वाढली असती असं मला वाटलं.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-