तांडव-taandav

महाबळेश्वर सैल यांची तांडव ही कादंबरी आपल्याला त्या काळातल्या गोव्यात घेऊन जाते जेव्हा पोर्तुगीज आक्रमण गोव्यावर नव्यानेच होत असतं. साम-दाम-दंड-भेद वापरून पोर्तुगीज धर्मान्तर कसे राहिले याचं चित्रण आहे.

आत्तापर्यंत झालेली आक्रमणं लढाया या राजकीय असायच्या सांस्कृतिक किंवा धार्मिक नाहीत. त्यामुळे अशा आक्रमणासाठी जणू समाज गाफिल होता. धार्मिक रुढींचा पगडा, जातिपातित विभागलेला समाज, वर्षानुवर्षांच्या स्थैर्याने लढाऊ पणा विसरलेला समाज म्हणजे धर्मवेड्या, क्रूर आणि सशस्त्र पोर्तुगीजांसाठी सोपा घास ठरू लागला.

देवळे पाडली गेली. देवच त्या गोऱ्या माकडाना शिक्षा करेल असं म्हणत चरफडण्याशिवाय पर्याय नव्हता. कोणी परागंदा झाले. गावाच्या सामाईक जमिनीच्या वारसा हक्क मिळावा म्हणुन लाचारिने कोणी ख्रिश्चन झाले. ख्रिश्चन झालेल्याशी चुकून सम्बन्ध आला तर आपण बाटलो,आता आपण हिन्दू नाही असा स्वतःचाच समज करुन बाप्तिस्मा घेऊ लागले. भीतीने आपणहूनच हिन्दू धर्माचार सोडत गेले.
एकएक वासा ढळत गेला.

नक्की वाचण्यासारखं आहे हे पुस्तक.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!)

पुस्तक - शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!)  लेखिका - वसुंधरा काशीकर भागवत (Vasundhara Kashikar - B...