आचार्य द्रोण (Acharya Dron)

पुस्तक : आचार्य द्रोण  (Acharya Dron)
लेखक : अनंत तिबिले (Anant Tibile)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३८४ 
ISBN : दिलेला नाही

हे पुस्तक महाभारतातील द्रोण या व्यक्तिरेखेची चरित्रात्मक कादंबरी आहे. द्रोणांचं चरित्र बहुतेक सगळ्यांना माहिती असेलच. थोडक्यात त्यांचा जीवनक्रम असा आहे :

भरद्वाज ऋषी घृता नवाच्या अप्सरेच्या प्रेमात पडतात आणि त्यांचा मुलगा होतो तो म्हणजे द्रोण. अप्सरा असल्यामुळे घृताला पृथ्वीलोकावर फार काळ रहणं शक्य नसतं. म्हणून द्रोणाचा जन्म झाल्याझाल्या ती त्याला आश्रमात सोडून निघून जाते. मातृसुखाला पारख्या झालेल्या द्रोणाचा संभाळ त्याचे वडील प्रेमाने करतात. त्यांच्या आश्रमातच द्रोण आणि पांचाल देशाचा राजकुमार द्रुपद यांची मैत्री होते. पुढे मोठे झाल्यावर द्रुपद राजा होतो तर द्रोण आपल्या वडिलांप्रमाणे गुरुकुल चालवणारा अध्यापक ऋषी. स्वतःच्या संन्यन्स्त आणि निरिच्छ वृतीमुळे ते गरीबीतच जगतात. पण पत्नी आणि मुलाला होणार त्रास बघून ते द्रुपदाची मदत घेण्यासाठी जातात. तेव्हा द्रुपद त्यांना मित्र म्हणून स्वीकारत तर नाहीच उलट निर्धन, लोचट ब्राह्मण म्हणून अपमानित करतो. द्रुपदाला धडा शिकवण्यासाठी, त्याचा संपत्तीचा गर्व हरण्यासाठी आपल्या शिष्यांकरवी त्याचा पराभव करतात. त्यामुळे द्रुपद अजूनच चिडतो आणि द्रोणांना मारण्यासाठी यज्ञ करून एका पुत्राची प्राप्ती करतो - तो म्हणजे धृष्टद्युम्न. तरी मैत्रीचं नाटक करून द्रुपद द्रोणांनाच त्याचा गुरू बनवतो. शेवटी महाभारत युद्धात धृष्टद्युम्न द्रोणांचा वध करतो. 

द्रोणपुत्र अश्वत्थाम्याला द्रोणांच्या गरिबीमुळे पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून प्यावं लगलं, द्रोणांचा शिष्योत्तम अर्जुन धनुर्विद्येच्या परीक्षेत "मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो" म्हणाला, द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून अंगठा मागून घेतला, युद्धाच्या वेळी युधिष्ठिराने "अश्वत्थामा मेला; "नरो वा कुंजरो" असं सांगितल्यामुळे द्रोणांनी आपला मुलगा मेला असं समजून शस्त्र खाली ठेवली इ. नेहमी उद्धृत होणाऱ्या गोष्टी आहेतच.

एकूणच "द्रोण" या व्यक्तिरेखेवरची कादंबरी वाचायला हातात घेताना हा सगळा माहितीचा भागच पुन्हा वाचायला लागेल; कदाचित दोन-तीन न महितीची उपकथानकं, चमत्कार वगैरे अजून समजतील असं मनाशी धरलंच होतं. त्यामुळे द्रोणांच्या चरित्राच्या माहितीपेक्षा ही पात्रं कशी रंगवली आहेत, त्यांचे राग-लोभ-द्वेष-शक्ती-भक्ती यांचे ताणेबाणे कसे विणले आहेत, नाट्य डोळ्यासमोर कसं उभं रहतं याचा अनुभव घेणं याची जास्त उत्सुकता होती. पण या बाबतीत ही कादंबरी पूर्णपणे अपयशी ठरते.

त्रयस्थ निवेदकाच्या निवेदनातून कथानक पुढे सरकलं तरी द्रोण या पात्राशिवाय कुठल्याच महत्त्वाच्या पात्राच्या मनात शिरून त्यांची भूमिका मांडली जात नाही. द्रोणाचे मनोव्यापार मांडताना सुद्धा; मी दुर्दैवी आहे, माझा मित्र द्रुपद मला नकारतो आहे, मी निरीच्छ वृत्ती स्वीकारल्यामुळे माझ्या बायको-मुलाला गरिबीत जगावं लागतं हेच पुन्हा पुन्हा लिहिण्यात पानंच्या पानं घालवली आहेत. अश्वत्थामा, दृपद, धृष्टद्युम्न हे या कथानकातले प्रतिनायक. ते तसे का वागले याचं काहीच चित्रण नाही.

एकलव्याचा अंगठा मगितला, "नरो वा कुंजरो वा"चा प्रसंग, द्रोणाने कौरवंना साथ केली असले प्रसंग अगदीच कोरडेपणे, "जताजाता सांगून जातो" थाटात मांडले आहेत. द्रोणपत्नीच्या तोंडी तर "मी हिंदू स्त्री; पतिच्या सुखात सुख मानणारी .." प्रकारची वक्य. "हिंदू" शब्द महाभारतकालीन आहे ? निर्धन म्हणून आजूबाजूच्या धनिक व्यक्तींनी त्यांचा अपमान केला असा उल्लेख कादंबरीत सारखा येतो. पण कोणी आणि का अपमान केला तो प्रसंग येत नाही. ज्याकाळात तपस्वी, मुनी, संन्यासी हा प्रकार समाजात सतत दिसतो तिथे धनिक लोकांन द्रोण हे का गरीब अहेत हे ठवूक असणार. जगविख्यात गुरू अहेत हे ठावूक असणारच न? मग ते अपमान कशाला करतील? हा प्रश्न पडतो. 

उदाहरणादाखल ही दोन पाने वाचा. 

एकलव्याच्या अंगठ्याचा प्रसंग. अंगठ्यामागचा काहीतरी भलताच तर्क अर्धवट दिला आहे.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



अश्वत्थामा म्हणे द्रोणाचार्यांशी सख्य ठेवून नव्हता. त्याबद्दल हे एवढेच:


नरो-वा-कुंजरो वा


कौरव-पांडवांच्या कथेमध्ये द्रोणाचं पात्र मध्यवर्ती नाही तरीही ते सतत आहे. त्यामुळे द्रोण मध्यवर्ती असणाऱ्या या कादंबरीत महाभारतातले इतर प्रसंग ओझरते येतात पण त्यामुळे चरित्रातली सलगता जाऊन या प्रसम्गातून त्या प्रसंगात उड्या मारणं होतं आणि मजा जाते. कृष्णासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीरेखेचा उल्लेख जेमतेम एखाददा येतो. द्रोणांशी तर त्याचा कही संबंधच येत नाही.

थोडक्यात, जर द्रोणांबद्दल, महाभारताबद्दल प्राथमिक माहिती असेल तर ही कादंबरी वाचायची गरज नाही. आणि माहिती नसेल तरी इतकं मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा या विषयावरचं दुसरं पुस्तकं वाचणं श्रेयस्कर.
दिलेला नाही.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...